Ad will apear here
Next
शैक्षणिक, सामाजिक संघटनांचा भाजपला पाठिंबा


पालघर : लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध समाजघटक भाजपच्या विचारधारेशी जोडले जात आहेत. पालघरसारख्या आदिवासीबहुल भागासह राज्याच्या विविध भागात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

मानव अधिकार संरक्षण संस्थान, स्वराज्य युवा शक्ती संघटना, स्वराज्य शक्ती संघटना, स्वराज्य महिला शक्ती संघटना आणि शिवउद्योग सहकार सेना आदी संघटनांचा यात समावेश आहे. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मानव अधिकार संरक्षण संस्थानचे पालघर जिल्हाप्रमुख सागर देशमुख आणि शिवउद्योग सहकार सेनेचे महाराष्ट्र समन्वयक मनोज डहाणुकर यांच्यासह दिनेश देशमुख, अनिल वडे, अपेक्षा रोकडे, मनीषा राणे, कल्पना जाधव, कृष्णा भोईर, राजश्री बेलकर, प्रवीण कोळी, समीर दास, सोदीत शुक्ला आणि प्रवीण वैती या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत देशमुख म्हणाले की, ‘आम्ही ज्या आदिवासी भागात काम करत आहोत त्या भागातील अनेक रस्त्यांच्या विस्तारिकरणाची कामे सुरू असल्याचे आम्ही पाहत आहोत. शिवाय वसई आणि विरार यासारख्या कायम दुर्लक्षित रेल्वे स्थानकांवरही कामे सुरू आहेत. पालघर हा जिल्हा नव्याने अस्तित्वात आला असून, अद्यापही या जिल्ह्याची प्रशासकीय घडी नीटपणे बसू शकली नाही; मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने विकास प्रक्रियेला जो वेग दिला आहे, त्यामुळे प्रभावित होत आम्ही भाजपशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZPOBO
Similar Posts
सुट्टीच्या दिवशी भाजपचा मतदारांशी थेट संपर्क पालघर : लोकसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानापूर्वीचा शेवटचा रविवार (१९ मे) भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत सार्थकी लावला.
‘२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’ मुंबई : ‘जनधन योजनेच्या माध्यमातून मोठे काम हाती घेण्यात आले असून, गरिब, आदिवासी लोकांना बँकेच्या कक्षेत आणण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केले; तसेच ज्यांना घर नाही अशा १२ लाख कुटुंबांपैकी चार लाख कुटुंबांना घर देण्यात आले आहे. २०१९पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक बेघर कुटुंबाला घर दिले जाईल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले
‘मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला नाही’ मुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारात जाहीरनाम्यातील मुद्दे मांडले असून, त्यामुळे आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग झालेला नाही,’ असे प्रतिपादन भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी (ता. २३) केले.
कोकण विकास मंचचा भाजपला जाहीर पाठिंबा पालघर : जिह्यातील सामाजिक कार्यकर्ते नीलेश सांबरे यांच्या कोकण विकास मंचाने भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर भाजपला पाठिंबा देत असल्याची घोषणा सांबरे यांनी केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language